
Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्यासह अनेक भागांतील केशर आंबा (Kehar Mango) लवकर बाजारात आणण्यात शेतकऱ्यांनी काही अंशी यश मिळवले. परंतु उत्पादनात (Keshar Mango Production) मात्र घटच दिसते आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीने आलेल्या उत्पादनालाही फटका देण्याचे काम केल्याने उत्पादकांच्या नुकसानीत भर पडली. त्यामुळे यंदा हंगाम मध्यमच राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळेच आता असलेले दरही स्थिर राहतील, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ग्राहकांचा लाडका केशर आंबा यंदा लवकर येण्याचे संकेत काही प्रमाणात खरे ठरले. तुळजापूर, पंढरपूर व सांगोला भागातील काही बागांमधील आंबा एप्रिलच्या पाहिल्या आठवड्यापर्यंतच काढायला आला.
माहितीनुसार कोकणाव्यतिरिक्त इतर महाराष्ट्रामध्ये ४५ हजार हेक्टरवर आंबा लागवड आहे. त्यापैकी साधारणतः २० ते २१ हजार हेक्टरवर अंबाबागा उत्पादनक्षम असाव्यात. त्यातील काही बागा २० ते २५ वर्षे जुन्या आहेत. तर नवीन ८ ते १० वर्षांतील बहुतेक बागा अतिघन पद्धतीने लागवड केल्या आहेत.
कोकण वगळता, मराठवाड्यासह राज्यातील केशर आंबा बागा साधारणत: डिसेंबर, जानेवारीमध्ये मोहरतात. यंदा आंबा बागांना मोहर लागणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सुरू राहिले.
सुरुवातीला मोहरलेल्या काही बागांतील आंबा मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढणीला आला. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मोहर व आंबा संकटात सापडल्याची स्थिती आहे. उत्पादन कमी असल्याने बाजारात आलेल्या केशर आंब्याला १५० ते २०० रुपये प्रति किलोपर्यंतचा दर मिळतो आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.