Crop Damage : तीन लाख शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे

जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तब्बल पावणेचार लाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले. शेतात पीक उभे असले तरी उत्पादन किती होईल, याबाबत अजूनही साशंकता आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon

यवतमाळ : जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तब्बल पावणेचार लाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झाले. शेतात पीक उभे असले तरी उत्पादन (Crop Production) किती होईल, याबाबत अजूनही साशंकता आहे. अशास्थितीत शेतकऱ्यांना मदतीची घोषणा शासनाने केली असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीचे आदेश आलेले नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त तीन लाख शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे लागल्या आहेत.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा

जिल्ह्यात गेल्या जुलै महिन्यात सलग १५ दिवस संततधार पाऊस होता. काही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुरामुळे पावणेतीन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने एक लाख हेक्टरवरील पीक बाधित झाले.

Crop Damage
Crop Damage : तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

बहुतांश ठिकाणांच्या शेतकऱ्यांचे नुकसान ३३ टक्क्यांवर आहे. अजूनही अनेक शेतांत पाणी आहे. काही शेत पुरापासून बचावले असले तरी अतिपावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील १३१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नदीनाल्यांना पूर गेल्याने नऊशेच्यावर गावे बाधित झाली आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

Crop Damage
Crop Damage : वर्धा जिल्ह्यात १२२ कोटी रुपयांचे नुकसान

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली. नुकसानीच्या क्षेत्रात एक हेक्टरची वाढ केली. प्रत्यक्षात अजूनही प्रशासनाला आदेश आलेले नाहीत. परिणामी, मदतीची घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने त्यात निर्णय होऊन मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

कापूस, सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

पावसाने जुलै व ऑगस्ट महिन्यांत दमदार हजेरी लावली. नदीनाल्यांना पूर आला. प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने प्रकल्पाचे पाणी शेतशिवारात शिरल्याने शेती जलमय झाली. त्यात कापूस, सोयाबीन व तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com