
नारायणगाव, ता. जुन्नर ः मळणी करून काढलेले एक टन सोयाबीन (Soybean Crop) घराच्या दरवाजाची दोन कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. (Soybean theft) ही घटना शनिवारी (ता. १५) पहाटे खोडद (ता.जुन्नर) येथे घडली. या प्रकरणी शेतकरी प्रवीण विलास पानमंद (Praveen Vilas Panmand) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात (Narayangaon Police Station) तक्रार दिली आहे.
प्रवीण पानमंद यांची खोडद येथील गारमाळ शिवारात शेती आहे. सात एकर क्षेत्रात त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. सततच्या पावसामुळे सोयाबीनचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाऊस, मजूर टंचाई , रासायनिक खते, कीटकनाशकांचे वाढलेले भाव, बिबट्यांची भीती आदी अनेक संकटाचा सामना करीत उत्पादित केलेले सोयाबीन पीक काढण्यास पानमंद यांनी शनिवारी (ता.१५) सुरुवात केली.
दिवसभरात दीड एकर क्षेत्रातील सोयाबीनची मळणी करून सुमारे दीड टन सोयाबीन तयार झाले. पावसाचा धोका विचारात घेऊन सोयाबीनच्या गोणी शेतातील घरात ठेवल्या. शेतावर बिबट्यांची भीती असल्याने घराच्या दरवाजाला दोन कुलपे लावून पानमंद शुक्रवारी (ता. १४) रात्री गावातील घरी झोपण्यास गेले.
मात्र, शनिवारी सकाळी शेतातील शिल्लक सोयाबीन काढण्यासाठी शेतात गेले असता घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक टन सोयाबीन चोरून नेल्याचे दिसून आले. या बाबतची तक्रार प्रवीण पानमंद यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.