
नांदेड : टोमॅटोचे (Tomato) फळ लहान अवस्थेत असताना वेळेपूर्वीच पिकत (Tomato Ripening) आहेत. यात कंपनीकडून निकृष्ट बियाणे दिल्याची तक्रार पांगरी (ता. अर्धापूर) येथील शेतकरी गजानन कदम यांनी अर्धापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
गजानन कदम यांनी एक एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली होती. नांदेड शहरातील एका कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून संशोधीत टोमॅटो बियाणे खरेदी केले होते. या बियाणांची रोपे तयार करून सप्टेंबरमध्ये लागवड केली.
या टोमॅटोच्या झाडाची फळे मोठी होण्यापूर्वीच अकाली पिकत आहेत. सदरील बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे आपले दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार गजानन कदम यांनी तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले यांच्याकडे केली आहे.
निवेदनात या प्रकरणी चोकशी करून कंपनीवर कारवाई करण्यात यावी. तसेच भरपाई देण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकांना देण्यात आली आहे.
बियाणे कंपन्यांची बोगसगिरी
जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना बियाणे कंपन्यांकडून बोगसगिरी केली जात आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांना उत्पादन मिळणे दूरच त्यांचा उत्पादन खर्चही वाया जात आहे.
टोमॅटो बियाणे उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांचे अपेक्षीत उत्पादन लक्षात घेऊन भरपाई द्यावी, अन्यथा कंपनीला धडा शिकवू, असा इशारा संभाजी ब्रिगेड किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.