Agriculture Scam : शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवून व्यापाऱ्याची दिवाळखोरी

न्यायालयात दिवाळखोरीचा अर्ज; शेतकऱ्यांचा आक्षेप
Agriculture Scam
Agriculture Scam Agrowon

Buldhana News : जिल्ह्यात चिखलीमध्ये (Chikhali) व्यापाऱ्याने शेतीमाल खरेदी करून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे चुकारे थकविले आहेत.

आता पैसे देऊ शकत नसल्याचे सांगत त्याने दिवाळखोरी जाहीर करण्याची तयारी चालविली आहे. यासाठी न्यायालयात धावसुद्धा घेतली आहे. शेतकऱ्यांनी याविरुद्ध आक्षेप नोंदविले आहेत.

चिखली बाजार समिती व एमआयडीसीमध्ये संतोष मनोहर गाडे व त्याच्या सहकाऱ्यांनी या भागातील विविध गावातील शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा शेतीमाल खरेदी केलेला आहे.

मात्र आता त्याने शेतकऱ्यांना पैसे न देता न्यायालयात जाऊन दिवाळखोरी घोषित करण्यासाठी अर्ज दिला आहे.

दरम्यान, आपले पैसे हे मिळालेच पाहिजेत, यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दिवाळखोरी घोषित करण्याच्या जाहीर नोटिशीवर हरकत दाखल केली आहे. पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून गाडे हे चिखलीमध्ये शेतीमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. शेतकऱ्यांचा त्यांनी विश्‍वास संपादन केला होता. मात्र या महिन्यात त्यांनी शेतकऱ्यांचे चुकारे देणे थांबविले होते.

पैसे देऊ शकत नसल्याने कायदेशीर दिवाळखोरी घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात जात जाहीर नोटिशीव्दारे आपल्याकडे शेतीमालाचे तसेच इतरांचे १० कोटी रुपये असल्याचे जाहीर केले.

परंतु हे पैसे देऊ शकत नसल्याचे मान्य केले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच असंतोष तयार झाला आहे.

Agriculture Scam
Agricultural Model : ‘लखपती शेती’चे मॉडेल ठरले शेतकऱ्यांचे आकर्षण

विश्वासघात करून गाडे व त्याच्या सहकाऱ्यांनी फसविल्याची तक्रार शेतकऱ्यांनी नोंदविली आहे. सातगाव भुसारी, खंडाळा मकरध्वज, गांगलगाव, सोमठाणा, काटोडा, गजरखेड, वैरागड, दरेगाव पेठ, शेळगाव अटोळ, कोनड अशा विविध गावांतील हे शेतकरी आहेत.


दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यानुसार, चिखलीतील व्यापारी संतोष गाडे व त्यांच्या बंधूंनी शेतकऱ्यांचा माल विकत घेतला. त्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकविले आहेत.

आता ते फरार असल्याची माहिती आहे. दरवर्षी पाच ते सहा व्यापारी शेतकऱ्यांना कोट्यवधीचा गंडा घालून फरार होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

‘रोखीनेच व्यवहार करा’
‘‘शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घ्यावा. जर कोणी व्यापारी जास्त भावाचे प्रलोभन दाखवून शेतीमाल उधारीवर खरेदी करीत असेल तर त्याला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. उधारीच्या बोलीवर व्यवहार-व्यापार न करता रोखीनेच व्यवहार करावा,’’ असे आवाहन श्री. तुपकर यांनी केले आहे.

कोट ः
‘‘चिखली तालुका व परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे थकवत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंवर कायदेशीर कारवाई करावी.
- रविकांत तुपकर, नेते,
स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com