Uddhav Thackeray On SC : थोडी तरी शिल्लक असेल तर..., सुप्रीम निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Nitish Kumar Meets Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली.
Nitish kumar meets Uddhav Thackeray
Nitish kumar meets Uddhav Thackeray agrowon

Uddhav Thackeray on Supreme Court Decision : सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाच्या प्रकरणात एक मोठा निर्णय दिला. यावर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला. आजच्या निर्णयाने सत्तेसासाठी हपापलेल्या उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे थोडी तरी शिल्लक असले तर राजीनामा द्यावा, अशी टिका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Nitish kumar meets Uddhav Thackeray
Supreme Court Decision on Shiv Sena : बहुमत चाचणी निर्णय चुकीचा ; राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

सर्वोच्च निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाेल, हा निकाल केवळ शिवसेनेसाठी निकाल नव्हता. तर लोकशाही जिवंत राहणार की नाही याचा हा फैसला होता. सर्वोच्च न्यायालयाने सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडं नागड्या राजकारणाची चिरफाड केली आहे. तत्कालीन राज्यपाल भरतसिंग कोश्यारी यांची भूमिका संशयास्पद होती. ती सरळ सरळ अयोग्य होती. त्याचं वस्त्रहरण झालं आहे. राज्यपाल ही यंत्रणा आदरयुक्त होती. त्याचे धिंडवडे शासनकर्ते काढत आहेत. त्यामुळे राज्यपाल यंत्रणा ठेवावी की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालयापुढे नेला पाहिजे. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नव्हता, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Nitish kumar meets Uddhav Thackeray
Supreme Court Decision on Shiv Sena : सर्वाच्च न्यायालयचा शिंदे गटाला पहिला झटका; गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर

मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे ठेवला असला तरी पक्षादेश देण्याचा निर्णय माझ्या शिवसेनेचाच राहणार आहे. कोर्टाने विधानसभेचा मान राखला आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या व्हीपनुसारच निर्णय द्यावा लागणार आहे, असंही ठाकरे यांनी सांगितलं.

२०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी आतापासून सत्ताधारी पक्ष भाजपा आणि विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी विरोधक राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आघाडीवर आहेत. ते मागील काही महिन्यांपासून देशातील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेत असून महाआघाडीसाठी प्रयत्नरत आहेत. नुकतेच त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या सोबत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, आदित्य ठाकरे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com