River Pollution : उल्हास नदीचे पाणी दूषित

ठाणे जिल्ह्यासाठी जीवनदायिनी म्हणून उल्हास नदी ओळखली जाते. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची शहरे व नदी किनारच्या ३५ ते ४० गावांना पिण्याचे पाणी याच नदीतून मिळते
River Contaminated Water
River Contaminated WaterAgrowon

टिटवाळा ः ठाणे जिल्ह्यासाठी जीवनदायिनी म्हणून उल्हास नदी (Ulhas River) ओळखली जाते. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची शहरे व नदी किनारच्या ३५ ते ४० गावांना पिण्याचे पाणी याच नदीतून मिळते. सध्या या नदीच्या पात्राची अवस्था दयनीय झाली आहे. नदीत सोडले जाणारे गावागावांतील सांडपाणी, नजीकच्या कारखान्याचे सांडपाणी यामुळे या नदीच्या पाण्याचा वास आणि चवही बदलली आहे. नदीचे पाणी प्रदूषित झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

River Contaminated Water
Sugar Price : साखरेच्या दरावर परिणाम होणार का ? | ॲग्रोवन

परिसरात सांडपाणी सोडण्याची पद्धत आजही जशीच्या तशीच आहे; तर दुसरीकडे याच नदी पात्रात ठिकठिकाणी गणपती, गौरी व दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. यातील प्लास्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंग, फटाक्यांची दारू यामुळे नदी पूर्णपणे मलीन झाली आहे. वाढत्या जलप्रदूषणामुळे या नदीचे पाणी दूषित (Water Pollution) झाले आहे. या पाण्यात अंघोळ केल्यानंतर अंगाला खाज येते. हेच रासायनमिश्रित दूषित पाणी ग्रामस्थ आणि शहरवासी पिण्यासाठी वापरत आहेत.

या नदीचे दूषित पाणी पिण्यात येत असल्याने दाताचे आजार, कॅन्सर, पोटाचे आजार, मूत्राशयाचे आजार वाढत आहेत. या नदीत सोडले जाणारे रासायनमिश्रित पाणी व गावागावांतून सोडले जाणारे सांडपाणी नदीत खुलेआम सोडणे बंद होणे गरजेचे आहे. त्यासाठी कारखानदारांना व ग्रामपंचायत प्रशासनाला तंबी देणे गरजेचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आपटी मांजरलीचे उपसरपंच कमलाकर भेरले यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com