
माणगाव ः काही दिवसांपासून जिल्ह्यातील हवामान ढगाळ (Cloudy Weather) आहे. बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतीसह वीटभट्टी व्यवसाय, कडधान्य शेती (Pulses) व आंबा बागायतदार चिंतेत आहेत. वातावरणात धुरकेही वाढले असून तालुक्यातील काही भागांत हलका पाऊस झाला आहे.
लांबलेल्या पावसाने वीटभट्टी व्यवसाय यंदा उशिराने सुरू झाला. मात्र आताच्या ढगाळ वातावरणामुळे, पावसामुळे पुन्हा व्यावसायावर संकट ओढावले आहे. तालुक्यात होणाऱ्या आंबा उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता असून मोहर बाधित होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.
ढगाळ वातावरणाचा अनुभव सर्वत्र येत असून प्रत्येक महिन्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे कडधान्य पिकांसह सर्वच पिकांचे नुकसान होत आहे.- नारायण मोंडे, शेतकरी, माणगाव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.