
Jalyukt Shiwar Scheme :``जालना जिल्ह्यातील वाटूर येथे साकारलेला जलतारा जलसंधारण प्रकल्प हा शेतकऱ्यांना ग्रामसमृद्धीकडे नेणारा जिव्हाळ्याचा विषय आहे.
हा प्रकल्प जालना जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा असून त्याचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात येईल,`` असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
जालना जिल्ह्यातील वाटूर (ता. परतूर) येथे श्री श्री ज्ञान क्षेत्र, आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्र येथे गुरूवारी (ता. २) आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते
यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर आदी उपस्थित होते.
सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांनी संयुक्तरित्या या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी विविध कंपन्यांनी आपले स्टॉल्स उभारून शेतकऱ्यांना आपल्या सेवा व उत्पादनांची माहिती दिली.
या मेळाव्यात शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांनी उभारलेल्या स्टॉलला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्राविषयी माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली.
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवांचा पुरवठा करून त्यांना सक्षम करण्यासाठी सलाम किसान हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सलाम किसान हे एक सुपरॲप असून शेती मूल्यसाखळीतील सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन' पुरवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
माती परीक्षण, ड्रोन फवारणी यांची प्रात्यक्षिके यावेळी शेतकऱ्यांना दाखवण्यात आली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी सलाम किसानच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी सलाम किसान नावाचे ॲप डाऊनलोड केले.
अधिकाधिक शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून कृषी ज्ञानाचा आणि सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सलाम किसान समूहाकडून करण्यात आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.