
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : श्रीक्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar) विकास आराखड्यातील पायरी मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी भोरगिरी (ता. खेड) आणि निगडाळे (ता. आंबेगाव) येथील ०.२८७ हेक्टर वनजमीन वळतीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे,
अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता रा. य. पाटील यांनी दिली आहे.
राखीव वन क्षेत्रांतर्गत भोरगिरी येथील गट क्रमांक १३० (सी. नं. २०१ क्षेत्र ०.०८४ हेक्टर) आणि निगडाळे येथील गट क्रमांक २४४ (सी. नं. २०० ए-क्षेत्र ०.१६८, ०.०२० व ०.०१५ हेक्टर) अशी एकूण ०.२८७ हेक्टर वनजमीन वळतीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वळतीकरणास मान्यता देताना पुढील अटी व शर्ती राहणार आहेत.
प्रकल्प यंत्रणा वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता दिलेल्या आदेशातील सर्व अटींचे पालन केल्याची उपवनसंरक्षक (वन्यजीव) पुणे यांनी खात्री करावी. अधिनियमातील अटींचे पालन न करणाऱ्यांवर वैधानिक कारवाई करण्यात येणार आहे.
कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात येऊ नये. मजुरांच्या वास्तव्यासाठी वनक्षेत्रात तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात येऊ नये. हा मान्यता आदेश एक वर्षापर्यंत वैध राहणार असल्याचे रा. य. पाटील पाटील यांनी कळविले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.