`चणकापुरा`तून गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडा, राष्ट्रवादीची मागणी

`चणकापुरा`तून गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडा, राष्ट्रवादीची मागणी
`चणकापुरा`तून गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडा, राष्ट्रवादीची मागणी

मालेगाव, जि. नाशिक : अत्यल्प पावसामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामदेखील वाया गेला आहे. फळबागा जगविण्यासाठी किमान चणकापूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

हरणबारी धरणाचे आवर्तन सिंचनासाठी सोडण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना, या आवर्तनामुळे सुटणार आहे. मालेगाव, सटाणा व देवळा तालुक्यांत पाण्याअभावी खरीप, रब्बी हंगाम वाया गेला आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे फळबागा जगविण्याची धडपड शेतकऱ्यांमध्ये आहे. चणकापूरचे किमान एक आवर्तन सिंचनासाठी सोडल्यास डाळिंब, पेरू, बोर, आवळा आदी फळबागा शेतकऱ्यांना वाचविता येतील. पाणी न मिळाल्यास लाख मोलाच्या या बागा नष्ट होण्याची भीती आहे. 

चणकापूरचे आवर्तन मालेगावसह दाभाडी, बारागाव योजनेस पिण्यासाठी सोडण्यात आले; मात्र त्यानंतर वीज वितरणतर्फे कालव्यावरील सर्व कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. शेतकऱ्यांची कोंडी केली गेली. विकतचे पाणी घेवून फळबागा जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नाही. पिण्याच्या पाण्याबरोबरच पाटबंधारे विभागाने सिंचनासाठी पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. पवार यांच्यासह जगदीश पवार, संदीप पवार, अनिल पवार, दादा हिरे, सतिष पवार, गोकुळ म्हसदे यांनी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com