शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द : भुजबळ

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द : भुजबळ
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द : भुजबळ

नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी, यासाठी शासनाने ''महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती'' योजनेच्या रूपाने मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस कवायत मैदान येथे आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभात पालकमंत्री यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरिक्षक छोरिंग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, महाराष्ट्र प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते.   या वेळी श्री. भुजबळ म्हणाले, कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कमी वेळेत कार्यवाही पूर्ण केली असून जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीयस्तरावर ''मुख्यमंत्री सचिवालय कक्ष'' कार्यान्वित करण्यात आला. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण विभाग पातळीवर कमी वेळात होणार आहे. त्याचप्रमाणे सेवा हमी कायद्यामधील पूर्वीच्या २० व नव्याने देण्यात येणाऱ्या ८१ सेवा मिळून सेवांची शंभरी गाठणारा नाशिक हा राज्यातील प्रथम व एकमात्र जिल्हा असल्याचे त्यांनी या वेळी नमूद करून पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनदंन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com