दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
बुलडाण्यात दोन कोटींची नुकसान भरपाई
''स्वाभिमानी''चे नेते रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २४) दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. याची दखल घेत तातडीने २ कोटी २४ लाख २९ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने तालुक्यांकडे वळती केला.
बुलडाणा : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देऊ, असे राज्य सरकार वेळोवेळी सांगत होते. दिवाळी उलटून दहा दिवस झाले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने ''स्वाभिमानी''चे नेते रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २४) दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. याची दखल रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घेण्यात आली. तातडीने २ कोटी २४ लाख २९ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने तालुक्यांकडे वळती केला. त्याचे पत्र आंदोलकांच्या हातात सोपविल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती. लवकर तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना समोरच चटणी भाकरी खाल्या व तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाने धावपळ सुरू केली. राज्य सचिव, कृषी सचिवांशी संपर्क करण्यात आला.
जिल्हाधिकारी एस. राममूर्ती व निवासी जिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर रात्री साडेसात वाजता तोडगा निघाला. जिल्हाधिकाऱ्यांनी २ कोटी २४ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मदत निधी तालुकानिहाय वर्ग केला. सदर निधी तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांचे (पात्र शेतकऱ्यांचे) नुकसान भरपाई वाटपाचे उदिष्ट पूर्ण होणार आहे.
ल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. उर्वरित तालुक्यातील नुकसान भरपाई निधी आठवडाभरात शासनाकडून प्राप्त होताच वितरित करू, असे ठोस आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईचा निधी होल्ड केला, परस्पर कर्ज खात्यात वर्ग केला तर त्या बँकेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश काढण्यासही स्वाभिमानीने जिल्हाधिकाऱ्यांना भाग पाडले.
आंदोलनात राणा चंदन, शे. रफिक शे. करीम, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, मयूर बोर्डे, ज्ञानेश्वर कल्याणकर, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, राजेश गवई, दत्ता पाटील, विजय बोराडे, कडूबा मोरे, रामेश्वर पवार, रामेश्वर अंभोरे, आकाश माळोदे, दत्तात्रय जेऊघाले, गजानन गवळी, मारोती मेढे,जबिर खान यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
- 1 of 1023
- ››