राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण 

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, तिकडे सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे दिसत आहे.
corona
corona

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, तिकडे सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शुक्रवारी (ता.२७) १२ रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांची संख्या २३ वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तब्बल १४७ वर पोहोचला आहे. 

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने सैन्य दलाची मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. 

इस्लामपुरात जे १२ नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्या ४ कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. ज्या कुटुंबातील चौघांना लागण झाली होती, त्यांचे कुटुंब मोठे आहे. या कुटुंबातील आधीच चौघांना कोरोनाची लागण झाली होती. हे चौघे हज यात्रा करुन आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, २५ मार्चला आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आणखी १२ जणांची चाचणी केली असता, त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. 

हे कुटुंब इस्लामपूरमधील आहे. महत्त्वाचे म्हणजे या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्नही केले जात आहे. त्यासोबत राज्य सरकारने सैन्य दलाची मदत मिळावी यासाठी पत्र लिहिले आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार म्हणाले, ‘‘राज्य सरकारने सैन्य दलाला पत्र लिहिले आहे. सैन्य दलाची गरज लागल्यास वैद्यकीय मदत मिळावी. यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. व्यापारी कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षही बाजारात विकू शकतात. त्यासोबत गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मच्छीही विकता येणार आहे. विक्रेत्यांनी फक्त विक्री करताना काळजी घ्यावी. तसेच पेट्रोल आणि डिझेल हे फळभाज्या आणि फळांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला दिले जाणार आहे,’’ असेही अजित पवार यांनी सांगितले. 

‘‘भीतीपोटी अनेक डॉक्टर दवाखाने बंद करत आहेत. हे चुकीचे आहे. डॉक्टरांकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांना देव मानले जाते. त्यामुळे त्यांनी दवाखाने सुरु ठेवावेत. डॉक्टरांनी तत्परता नाही दाखवली तर सर्वसामान्यांनी जायचे कुठे? अशा शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी डॉक्टरांचे कान टोचले आहेत 

कर्जमाफीच्या कामाला स्थगिती  ‘‘शेतकरी कर्जमाफी योजनेच्या कामाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. शेतकरी बायोमेट्रिकसाठी तयार नसल्यामुळे काम थांबले आहे. सध्या प्राधान्य कोरोनाच्या कामाला दिले जात आहे,’’ असेही अजित पवार म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com