राज्यात महापुरामुळे सतराशे गायी-म्हशी दगावल्या

पूर
पूर

पुणे: राज्यात जुलै महिन्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या पंचनाम्यानुसार मृत झालेल्या पशुधनामध्ये सुमारे १ हजार ७०० गायी- म्हशींचा समावेश असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे सांगण्यात आले. यामध्ये सर्वाधिक संख्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पशुधनाची आहे. तर गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि कुक्कुट यांची एकूण संख्या सुमारे २ लाख ३४ हजार ३७० एवढी आहे. यामध्ये सुमारे २ लाख ३१ हजार कोंबड्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात आकडा वाढण्याची शक्यता आहे.  राज्यात उद्‍भवलेल्या पूरपरिस्थितीनंतर आता वातावरण पूर्वपदावर येत असून, पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सुरू आहेत. २९ ऑगस्टच्या पंचनाम्याअखेर राज्यात १७ जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये मृत झालेल्या गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि कुक्कुट यांची एकूण संख्या सुमारे २ लाख ३४ हजार ३७० एवढी आहे. यामध्ये सर्वाधिक गायी, म्हशी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मृत झाल्या आहेत. यामध्ये सांगलीत २७६ गायी आणि २३८ म्हशींचा, तर कोल्हापूर येथे २७० गायी आणि २७६ म्हशींचा समावेश आहे.  दरम्यान, मृत झालेल्या पशुधनाची नुकसानभरपाई अतिशय तोकडी असल्याने नुकसानभरपाईची वाढ करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गायी, म्हशींना ३० हजार रुपये नुकसानभरपाई केवळ ३ पशुधनांसाठीच मर्यादित आहे. अनेक शेतकऱ्यांचे दुभते आणि जास्त किमतीचे पशुधन मृत झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com