सिंचन प्रकल्पांना साडेसहा हजार कोटींचे कर्ज

सिंचन प्रकल्पांना साडेसहा हजार कोटींचे कर्ज
सिंचन प्रकल्पांना साडेसहा हजार कोटींचे कर्ज

पुणे (प्रतिनिधी) ः बळिराजा जलसंजीवनी योजनेतून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील व उर्वरित महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना नाबार्डकडून ६ हजार ६५५ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.  नाबार्डच्या पायाभूत सुविधा विकास योजेनतून हे कर्ज मंजूर करण्यात आले असून, २०२२ पर्यंत ६८ प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. बळिराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांना केंद्र शासनाच्या सूचनेनुसार विशेष पॅकेजअंतर्गत नाबार्डकडून १० हजार २३८ कोटी कर्जाद्वारे उपलब्ध होणार आहेत.  

हे कर्ज ग्रामीण पायाभूत विकास निधी  आणि नाबार्ड पायाभूत विकास निधीद्वारे ३५ आणि ६५ टक्के देण्यात येणार आहे. यापैकी नाबार्ड पायाभूत विकास निधीमधील ६ हजार ६५५ कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या निधीमध्ये ६८ प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  या कर्जाचा व्याज दर वर्षाला ९.२५   टक्के एवढा असणार असून, हे कर्ज सात वर्षांसाठी देण्यात आले आहे. तर एक वर्ष सवलतीच्या कालावधीला नाबार्डने मान्यता दिलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com