सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात भीमा नदीला आलेल्या पूरपरिस्थितीमुळे माढा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे व जमिनीचे नुकसान झाले होते. त्यांच्यासाठी आठ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील’’, अशी माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये माढा तालुक्यातील १२ गावे, पंढरपूर तालुक्यातील २५ गावे आणि माळशिरस तालुक्यातील ९ गावांतील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पूर परिस्थितीमुळे फळबागा, चारा वैरण पिकांसहीत जमिनीचे देखील अतोनात नुकसान झाले.
संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाने मदत करावी, म्हणून पाठपुरावा केला होता. पूरग्रस्त गावांसाठी २२ कोटी १४ लाख ६२ हजार ८०२ रुपयांची शासनाकडून मागणी केली होती. या पैकी १४ कोटी ४७ लाख १७ हजार ७११ रुपये डिसेंबरमध्ये मंजूर झाले होते. त्याचे तातडीने संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात आले.’’
‘‘ दरम्यान, काही पूरग्रस्त शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले होते. त्यांच्यासाठी अतिरिक्त ८ कोटी ६७ लाख ४५ हजार रपये एवढ्या अतिरिक्त निधीची शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार हा निधी मंजूर झाला. लवकरच तहसीलस्तरावरुन त्याचे वाटप होईल’’, असेही ते म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.