सोलापूर : ‘‘करमाळा तालुक्यातील गटशेती प्रकल्पातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे दर्जेदार उत्पादन करून विक्री आणि प्रक्रिया क्षेत्रात केलेले कार्य पथदर्शी आहे,’’ असे राज्याच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) संचालक के. एस. मुळे यांनी शेटफळ (ता.करमाळा) येथे बोलताना सांगितले.
करमाळा तालुक्यातील गटशेतीच्या प्रकल्पास मुळे यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी शेटफळ येथील लोकविकास फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या गटशेती प्रकल्प व पेरू लागवड प्रक्षेत्र भेट प्रसंगी ते बोलत होते. कंदर येथील सनस्टार ए-वन व कण्वमुनी शेतकरी उत्पादक कंपनी, करमाळा येथील कमलाभवानी शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रकल्पास भेटी दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी त्यांनी समजावून घेतल्या.
मुळे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी आता स्वतःच्या वाटा चोखाळल्या पाहिजेत. शासन त्यांना खंबीरपणे साथ देण्यास तयार आहे. बदलत्या बाजारपेठेनुसार उत्पादन घेतले पाहिजे. त्याचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवली पाहिजे, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.''
शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्मार्ट प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, तंत्र अधिकारी शरद सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी सदाशिव सोनवर, तालुका कृषी अधिकारी गणेश दुरंदे, कृषीरत्न आनंद कोठडिया,आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.