कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे हाच केंद्र सरकारपुढे पर्याय आहे. राज्य शासन आरक्षणासाठी सकारात्मक आहे, असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांची सोमवारी (ता. १४) भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही शाहू महाराज म्हणाले. छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘‘सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून, त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे, ते सर्व केले पाहिजे. मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष असून, यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही. मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही, त्यांनी तो करणे गरजेचा आहे. त्याचे मराठीत भाषांतर करून अर्थ समजून घेतला पाहिजे. तसेच कोर्टाचा अवमानही होता कामा नये.’’ सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, या दोन्ही संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.