अतिवृष्टिग्रस्तांसाठी १० हजार कोटी

राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय बुधवारी (ता. १३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
10,000 crore package announced for flood victims
10,000 crore package announced for flood victims

मुंबई ः राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय बुधवारी (ता. १३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. 

या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसाह्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शेतकऱ्यांना ही मदत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर, बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रतिहेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी राहणार असून, कमाल २ हेक्टर मर्यादेत करण्यात मदत मिळणार आहे.

अशी मिळणार मदत

  • जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर
  • बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रतिहेक्टर 
  • बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टर 
  • ही मदत २ हेक्टर मर्यादेतपर्यंत करण्यात येईल.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com