नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
अॅग्रो विशेष
नागपूरात १०.६ अंश तापमान
पुणे ः मुंबईजवळील अरबी समुद्रातील चक्रावाताची स्थिती निवळल्याने राज्यात पुन्हा थंडीने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, गोंदिया, नागपूर तर मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील नागपूर येथे १०.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पुणे ः मुंबईजवळील अरबी समुद्रातील चक्रावाताची स्थिती निवळल्याने राज्यात पुन्हा थंडीने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, गोंदिया, नागपूर तर मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील नागपूर येथे १०.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अरबी समुद्राच्या वायव्येस पवन चक्रीवादळाची तीव्रता अधिक आहे. पुढील एक ते दोन दिवस त्याची तीव्रता राहणार असून, त्याचा ताशी वेग २६ किलो एवढा आहे. हे चक्रीवादळ येमेनमधील सोकोट्रापासून आग्नेयेच्या दिशेला सुमारे ४६० किलोमीटर, तर सोमालियातील बोसासोपासून ५४० किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबई जवळ असलेल्या दुसऱ्या चक्रावाताची स्थिती काही प्रमाणात निवळल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. त्यामुळे राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा परतण्यास सुरुवात झाली आहे.
मराठवाडा विदर्भात हवामान पूर्णतः कोरडे झाल्याने किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे थंडीने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, गोंदिया येथील किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. येथील तापमान १० ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातही किंचित थंडी वाढली आहे.
उस्मानाबादमध्ये सर्वांत कमी १३.८ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. परभणीतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामानाची तीव्रता कमी झाल्याने थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाबळेश्वरमध्ये १४.२ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते.
मध्य महाराष्ट्रात १४ ते १८ अंश सेल्सिअस तर, खानदेशात १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. कोकणातही हवामान कोरडे असल्याने किमान तापमानात किंचित घट झाली असून, थंडीने फारसा जोर धरलेला नाही.
शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः
नगर १६.६ (४), अकोला १३.६ (-१), अलिबाग २३.५ (४), अमरावती १४.४(-२), औरंगाबाद १४.७ (२), बीड १७.३ (४), बुलडाणा १४.४ (-१), चंद्रपूर १४.०, डहाणू २३.७ (४), गोंदिया ११.८ (-२), जळगाव १७.० (४), कोल्हापूर २०.४, महाबळेश्वर १४.२, मालेगाव १७.८ (५), मुंबई २२.६ (३), नागपूर १०.६(-३), नांदेड १५.० (१), नाशिक १८.६ (७), उस्मानाबाद १३.८, परभणी १४.० (-१), लोहगाव १९.४ (७), पुणे १७.९ (५), रत्नागिरी २३.४ (२), सांगली २०.४ (५), सातारा १८.९ (४), सोलापूर १९.१ (३), ठाणे २३.०, वर्धा १३.९ (१), यवतमाळ १३.९ (१),