मुंबई : महाराष्ट्रातून एका महिन्यात ११२७ टना पेक्षा अधिक डाळिंबाची वाहतूक उत्तर भारतातील बिहार राज्यात करण्यात आली आहे. राज्यातून किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा चालविण्यात येत असून, वाजवी दरात आणि वेगवान वाहतूक होत असल्याबद्दल शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. डाळिंब, सिमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, आईस्ड-फिश, जिवंत वनस्पती, अंडी आणि इतर भाज्याची वाहतूक महाराष्ट्रातील सांगोला, पंढरपूर, कोपरगाव, पुणे, दौंड, नाशिक, मनमाड या भागांतून केली जात आहे. किसान रेल्वेने आत्तापर्यंत वाहून नेलेल्या एकूण शेतमालांपैकी ११२७.६७ टन डाळिंबाची वाहतूक केली आहे. एकूण शेतमालाच्या तुलनेत ती ६१ टक्के आहे. किसान रेल्वेस ७ ऑगस्टला देवळाली ते दानापूर (बिहार) पर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूर (बिहार)पर्यंत विस्तारित करण्यात आली. पुढे यास सांगोला-पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल्वे आठवड्यात तीनदा सुरू आहे. शेतक-यांचा या रेल्वे सेवेस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि सोलापूरमध्ये डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ६२.९१ टक्के आहे. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ (पुणे) कडून किसान रेल्वेच्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
किसान रेल्वेची वैशिष्टे...
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.