रत्नागिरी जिल्ह्यात धरणांतील साठ्यात १.१८ टक्के वाढ

रत्नागिरी जिल्ह्यात धरणांतील साठ्यात १.१८ टक्के वाढ
रत्नागिरी जिल्ह्यात धरणांतील साठ्यात १.१८ टक्के वाढ

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील तीन मध्यम आणि ४६ लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठा १.१८ टक्क्यांनी वाढला आहे. आठवड्यापूर्वी ३७.४८ टक्के पाणीसाठा होता. तो आता ३८.६६ टक्के झाला आहे. 

पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील धरणे तळ गाठू लागली होती. नातूवाडी, अर्जुना आणि गडनदी या तीन मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.७३ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी आहे. ते आता ७८.५७ टक्के झाले आहे. गेल्या आठवड्यात ते ४२.५५ टक्के होते. आज तो ४३.०१ टक्के झाले. 

जिल्ह्यातील ४६ लघु पाटबंधाऱ्यांपैकी १२ धरणांत समाधानकारक पाणीसाठा आहे. यात चिंचवळी ५४ टक्के, ओझर ६० टक्के, बारेवाडी ६२ टक्के, अर्जुना ९३ टक्के , इंदवटी ७७ टक्के, मुचकुंदी ८७ टक्के, झापडे ५० टक्के, रांगव ४९ टक्के, मोरवणे ५६ टक्के, कुरवळ ५७ टक्के, शेलारवाडी ६२ टक्के आणि सोंडघर धरणांत ५० टक्के पाणीसाठा आहे. 

जिल्ह्यातील १५ धरणे आटली आहेत. त्यामध्ये चिंचाळे, टांगर, सुकोंडी, फणसवाडी, अडरे, असुर्डे, राजेवाडी, मोर्डे, निवे, गडनदी, शिपोशी, केळंबा, पन्हाळे, कुवा, तळवडे या धरणांमध्ये ५.४८ ते ००.०० टक्के पाणीसाठा आहे. या पावसामुळे या धरणांमध्येही १ ते २ टक्के पाणीसाठा वाढला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com