परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधित

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार पाच तालुक्यांतील १२७ गावे बाधित झाली आहेत. दोन जणांचा मृत्यू झाला. तर लहान मोठी मिळून ९१ जनावरे दगावली आहेत, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
127 villages affected in Parbhani district
127 villages affected in Parbhani district

परभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता. ७) या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार पाच तालुक्यांतील १२७ गावे बाधित झाली आहेत. दोन जणांचा मृत्यू झाला. तर लहान मोठी मिळून ९१ जनावरे दगावली आहेत, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी, दुधना, पूर्णा, गलाटी, लेंडी आदी नद्यांसह अनेक ओढे, नाले यांच्या पुराच्या पाण्यामुळे ९ पैकी ८ तालुक्यांतील हजारो हेक्टरवरील शेतीपिके, फळपिके, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु त्याबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यातील २७ गावे, पाथरी तालुक्यातील ३०, गंगाखेड तालुक्यातील ४०, पालम तालुक्यातील १३, पूर्णा तालुक्यातील १७ अशी एकूण १२७ गावे बाधित झाली आहेत.

सायाळा (ता. गंगाखेड) आणि पोहंडूळ (ता.मानवत) येथील प्रत्येकी एका व्यक्तीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. पूर्णा तालुक्यातील ६१, गंगाखेड तालुक्यातील ७, पालम तालुक्यातील ४ असे एकूण ७२ लहान जनावरे दगावली. परभणी, पाथरी तालुक्यांतील प्रत्येकी १, गंगाखेड तालुक्यातील ८, पालम तालुक्यातील ९ असे एकूण १९ मोठे जनावरे दगावली आहेत. अंशतः पडझड झालेल्या घरांमध्ये  गंगाखेड तालुक्यातील ६४२, पालम तालुक्यातील २६२, पूर्णा तालुक्यातील ११०, परभणी तालुक्यातील १५, सेलू तालुक्यातील ७, पाथरी तालुक्यातील २५ असा मिळून एकूण १ हजार ६१ घरांचा समावेश आहे.

 हिंगोलीत अतिवृष्टीचा नऊ हजार हेक्टरवरील पिकाला फटका हिंगोली जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये मंगळवारी (ता. ७) झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ८ हजार ९१९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टिग्रस्त क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. या संदर्भात पालकमंत्री गायकवाड यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी संवाद साधून जिल्ह्यातील ३० मंडळांपैकी २० मंडळांतील अतिवृष्टी, पूर परिस्थिती, पीक नुकसान, जीवित व वित्तहानी याबाबत माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, हळद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चार व्यक्ती पुरात वाहून गेलेले आहेत. बावीस घरांची पडझड झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील तीन गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com