सिंधुदुर्गातील १५ हजार शेतकरी राहणार कर्जमाफीपासून वंचित

loan waiver scheme
loan waiver scheme

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात मध्यम मुदत शेती कर्ज आणि शेतीपूरक खावटी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या १५ हजार आहे. त्या शेतकऱ्यांवर ७० कोटींचा बोजा आहे. मात्र, सरकारने फक्त अल्पमुदत कर्ज माफ केल्यामुळे हे सर्व शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे अल्पमुदत थकीत कर्ज माफ केले जाणार आहे. सिंधुदुर्गातील २७ हजार शेतकऱ्यांचे अल्प, मध्यम आणि कृषिपूरक खावटी अशाप्रकारे सुमारे १२० कोटी रुपये कर्ज थकीत आहे. यातील अल्पमुदत कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या १२ हजार आहे. शासनाने केलेल्या कर्जमाफीनुसार त्यांचे ५० कोटी रुपये माफ होतील. यातील १० हजार शेतकरी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेले आहेत. त्यांचे ४० कोटी रुपये थकीत आहेत. इतर २ हजार शेतकरी इतर बँकांकडील आहेत. मात्र मध्यम मुदत शेतीकर्ज, शेतीपूरक खावटी कर्जदारांचे ७० कोटी रुपये कर्ज थकीत आहेत. कर्जमाफीच्या निकषाप्रमाणे या थकबाकीदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. जिल्हा बँकेकडील मध्यम आणि खावटी कर्जदार ८ हजार ५३५ आहेत. या शेतकऱ्यांचे सुमारे २० कोटी ५३ लाख रुपये थकीत आहेत. इतर बँकांकडे ७ हजार शेतकरी आहेत. त्यांचे थकीत कर्ज हे सुमारे ५० कोटी आहे. हे कर्ज माफ होणार नसल्याने जिल्ह्यातील हे १५ हजार शेतकरी कर्जातच राहतील.  बॅंका अडचणीत कर्जमाफ होईल म्हणून बँकांनी यापूर्वी वसुलीचा तगादा लावला नाही. या कर्जामुळे आता बँकासुध्दा अडचणीत आल्या आहेत. सहकार निबंधक आणि जिल्हा बँकेच्या प्राथमिक अहवालात ही आकडेवारी आहे. त्यात काही अंशी बदल होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com