जिल्हा योजनेत राज्य शासनाकडून १५ हजार ४७५ कोटींची वाढ

जिल्हा योजनेत राज्य शासनाकडून १५ हजार ४७५ कोटींची वाढ
जिल्हा योजनेत राज्य शासनाकडून १५ हजार ४७५ कोटींची वाढ

मुंबई : राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेत २००९-१० ते २०१३-१४ च्या तुलनेत १५,४७५ कोटी रुपयांनी वाढ केल्याची माहिती अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. २००९-१० ते २०१३-१४ पर्यंत जिल्हा वार्षिक योजनेसाठी २१,५२७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. पाच वर्षांची याची सरासरी काढल्यास ती ४३०५ कोटी रुपये इतकी होती. मागील पाच वर्षांत म्हणजे २०१४-१५ ते २०१८-१९ या पाच वर्षांत राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेसाठी ३७००३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या पाच वर्षांची सरासरी ७ हजार ४०० कोटी रुपये असल्याचे ते म्हणाले. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याची स्थानिक आणि भौगोलिक वैशिष्ट्ये असतात, प्रत्येक जिल्ह्याची गरज वेगवेगळी असते, हे लक्षात घेऊन जिल्हास्तरीय योजनांची आखणी होते. त्याची प्राधान्याने पूर्तता करण्यासाठी जिल्हा योजनेतून निधी देण्यात येतो. यात विविध सामाजिक क्षेत्रांबरोबर जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांचाही समावेश असतो. जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठीही यातून निधी उपलब्ध करून दिला जातो. जिल्हा विकसित झाला, तर राज्य विकसित होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होते. त्यामुळे गाव, खेडे केंद्रिभूत मानून विकास नियोजन करताना त्या त्या जिल्ह्याला विकासासाठी अधिक निधी मिळावा आणि त्यातून राज्याची चौफेर प्रगती व्हावी, याकडे शासनाने अधिक लक्ष दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com