पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर कारखाने बंद

पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर कारखाने बंद
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर कारखाने बंद

पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. तरीही अजूनही अनेक साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केलेला नाही. पुणे विभागात अजूही १८ साखर कारखाने बंद आहेत. त्यामुळे चालू वर्षी नक्की किती साखर कारखाने सुरू होणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

शासनाने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र उशिराने झालेल्या पावसामुळे गळीत हंगाम सुरू होण्यास विलंब झाला. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी उशिराने साखर कारखाने सुरू केले होते. विभागातील पुणे, सातारा जिल्ह्यांतील १६ साखर कारखान्यांचे धुराडे पेटवत गाळप हंगाम सुरू केला आहे. उर्वरित कारखान्याचाही गळीत हंगाम येत्या आठ दिवसांत सुरू होणार असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  

यंदा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडून एफआरपीचा मुद्दा पुढे केला होता. एफआरपी दिल्याशिवाय परवाने दिले जाणार नाही, अशी भूमिका साखर आयुक्तांनी घेतली होती. त्यानुसार राज्यातील १६३ कारखान्यांनी गाळपासाठी परवाने मागितले होते. त्यापैकी आत्तापर्यंत ८९ हून अधिक साखर कारखान्यांनी परवाने घेऊन साखर कारखाने सुरू केले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दहा, तर सातारा जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांचाही समावेश आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसांत हे कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.

पुणे विभागात सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास ३४ साखर कारखाने आहेत. त्यांनी चालू गळीत हंगामात १५ लाख मेट्रिक टनांहून साखरेचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात, तर सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे आणि पाणीटंचाईमुळे उसाच्या लागवडीत घट झाली असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे दोन लाखाहून अधिक हेक्टरवरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजूर कारखाना स्थळावर दाखल होत आहेत. उसाच्या तोडणीस काही ठिकाणी प्रारंभ झाला आहे. यंदाच्या गाळप हंगामात ऊस तोडणासाठी मजुरांएेवजी, ऊसतोडणी यंत्राचा वापर होणार आहे. त्यामुळे साखर कारखाना कार्यस्थळावर वर्दळ वाढली असल्याचे साखर कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यात सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम दरवर्षी आॅक्टोबर, नोव्हेबर महिन्यात होतो. त्यासाठीशेतकरी मोठ्या प्रमाणात लागवडी करतात. विभागात साधारणपणे उसाचे सरासरी दरवर्षी दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र असते. 

२३ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन 

विभागात सहकारी व खासगी कारखान्यामध्ये सोमेश्‍वर सहकारी साखर कारखाना, माळेगाव, संत तुकाराम, विघ्नहर, भीमा शंकर, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज शुगर्स, बारामती अॅग्रो, व्यंकटेश शुगर, पराग, श्रीराम फलटण, कृष्णा, लो.बा. देसाई, सह्याद्री, अजिक्यतारा, जयशंत असे एकूण दहा साखर कारखाने सुरू झाले आहेत. या साखर कारखान्यांनी ४२ हजार ९८७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून २३ हजार ७०० क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा ५.५१ टक्के एवढा आहे, असे पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com