अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत राज्यभरात २२ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर जागृती करण्यात आली. परंतु तरीही अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १८३ शेतकरी, मजुरांना विषबाधा होत दोघांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यान विषबाधा झालेल्या १८३ पैकी १८१ जणांच्या प्रकृतीत उपचाराअंती सुधारणा झाली. फवारणीदरम्यान विषबाधा होत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असलेल्या दोघांचा व्हिसेरा अद्याप अप्राप्त आहे. त्यामुळे त्यांचा कीटकनाशक फवारणीदरम्यान मृत्यू झाला याविषयी स्पष्टता नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
विशेष म्हणजे फवारणीदरम्यान काय काळजी घ्यावी, याविषयी कृषी विभागाकडून सातत्याने जागृती केली जात आहे. या मोहिमेवर मोठा खर्चही दरवर्षी होतो. काही कंपन्यांना देखील जिल्हानिहाय प्रसाराबद्दल सांगण्यात आले आहे. मात्र त्यानंतर देखील विषबाधांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची स्थिती आहे. विषबाधा झाल्यास डोळे जळजळणे, चेहऱ्याची, पूर्ण शरीराची आग होणे, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात, असेही कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. कृषी विभागाचे आवाहन
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.