नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१४) देशातील जवळपास १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (पीएम-किसान) आठवा हप्ता जमा केला. या वेळी १९ हजार कोटी थेट शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आले. पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा ८ वा हप्ता वितरित करण्यात आला. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पात्रताधारक शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी थेट जमा करण्यात आले. याचा जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला. तर पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ मिळाला.
‘‘शेतीमध्ये नविन संधी, पर्याय आणि उपाययोजना करण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. सरकार सेंद्रिय शेतीलाही प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. सेंद्रिय शेतीतील पिकांचा उत्पादन खर्चही कमी आहे. तसेच मृदा, आपल्या आरोग्यासाठीही ही पिके लाभदायक असून त्यांना जास्त दरही मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनीही सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे,’’ असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केले. हमीभावाने शेतमाल खरेदीचा विक्रम देशात कोरोनाचे आव्हान असताना शेतकऱ्यांनी अन्नधान्य उत्पादनाचा विक्रम केला. अर्थव्यवस्थेला आधार दिला. तर सरकारही दरवर्षी हमीभावाने शेतमाल खरेदीचा विक्रम करत आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्के अधिक गव्हाची हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. सरकार शेतकऱ्यांना आधार देत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.