जळगाव जिल्हा परिषद शाळांच्या २० इमारती धोकादायक

जिल्हा परिषद शाळांच्या २० इमारती धोकादायक
जिल्हा परिषद शाळांच्या २० इमारती धोकादायक

जळगाव : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे २० इमारती धोकादायक स्थितीत आहेत. येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत या शाळांचे पाडकाम करून संबंधित इमारतींचे बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण करा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

चाळीसगाव तालुक्‍यात कळमडू, बहाळ, यावलमध्ये साकळी, कोरपावली, चोपड्यात अडावद, मंगरूळ, जळगावात कानळदा, म्हसावद आदी अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती, छप्परांची अवस्था दयनीय आहे. कळमडू येथील शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ती तातडीने पाडावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. 

कळमडू येथील शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. या शाळेत गावातील शंभरच्यावर मुले -मुली शिक्षण घेतात. कौलारू छपराची ही इमारत जीर्ण झाली आहे. 

कळमडू येथील रहिवासी संगणक अभियंता गुणवंत सोनवणे यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या ‘आपले सरकार'' या पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. तिची दखल घेऊन २८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात आली. ही शाळा निर्लेखित करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. 

अनेक जणांना ‘आपले सरकार‘ पोर्टलवर तक्रार दाखल करता येत नाही. जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडे तक्रार केल्यास राजकारण सुरू होते. एक गट दुसऱ्या गटाचे काम मार्गी लागू देत नाही. अशात शाळांच्या इमारतींकडे दुर्लक्ष झाले. काही इमारतींना पाडण्याची गरज नाही. केवळ छप्पराची दुरुस्ती केली, तरी पुढील १० ते १५ वर्षे इमारत सुस्थितीत राहतील. काही ठिकाणी इमारतीचे लाकडी खांब वाकल्याची स्थिती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com