‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य शहरांसाठी राखीव

‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य शहरांसाठी राखीव
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य शहरांसाठी राखीव

सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातील २० टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पातून पिण्याच्या पाणी आरक्षित करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. सोलापूर शहर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी २० टीएमसी पाणी राखीव ठेवले जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठ मध्यम आणि ५६ लघुप्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी शेतीसाठी न वापरता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले जाईल, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी उजनी आणि जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत असलेल्या पाणी साठ्याची माहिती दिली. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या. बैठकीस  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, भीमा कालवा मंडळचे कार्यकारी अभियंता ना. वा. जोशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजकुमार चंदनशिवे, राज्य वीज वितरण कंपनीचे वि. शं. बच्चे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com