जालना : बांधावर खत पुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सूरू झाली आहे. शुक्रवारी (ता.८) अंबड तालुक्यातील पिंपरखेड येथील मत्स्योदरी ॲग्रो प्रोड्युसर कपंनीमार्फत जवळपास २०० शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ४८ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला.
राज्यावर कोरोना विषाणूचे संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामाच्या तयारीला कोणत्याही अडचणी येऊ नये, खते व बियाणे खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पोच करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे खत पुरवठा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
खरीप हंगाम सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत. शेत मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात आहेत. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांची बियाणे व खते खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने कापूस बियाणे विक्री तुर्तास बंद केली आहे. खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा गावात खताचा व बियाणांचा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. एखाद्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांनाही खताचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भिमराव रणदिवे यांनी दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.