सोलापूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात १८ आणि १९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने जिल्ह्यातीने सुमारे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक फळे आणि कांद्याचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडे त्यासंबंधीची प्राथमिक माहिती आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार त्यावर पुढील कार्यवाही होईल, असे संबंधित सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. यामध्ये काढणीस आलेल्या द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आणि फळभाज्यांसह आंब्याचेही मोठे नुकसान झाले. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, करमाळा तालुक्यात प्रामुख्याने हे नुकसान झाले. कृषि विभागाकडून गावस्तरावर नुकसानीच्या पाहणीचे काम सुरु आहे.
आतापर्यंत सुमारे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तरीही कृषि विभागाच्या अंतिम अहवालानंतर नुकसानीचा नेमका आकडा समजेल, असे कृषि विभागाकडून सांगण्यात आले. सध्या ‘कोरोना’मुळे आधीच शेतकरी शेतमाल विक्रीच्या प्रश्नावरुन हतबल झाला आहे. कसे-बसे भाजीपाला, कांदा ही पिके हातविक्री करुन त्यावर मार्ग काढत आहेत. पण, अवकाळी पावसाने त्यांच्या कष्टावर पाणी फेरले गेले. आता त्याच्या भरपाईतून काही मिळेल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.