चंद्रपुरात लॉकडाउनकाळात २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

चंद्रपूर ः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, शासकीय धोरणाला कंटाळत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने अधिकच वाढल्याने गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
22 farmers commit suicide in lockdown
22 farmers commit suicide in lockdown

चंद्रपूर ः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, शासकीय धोरणाला कंटाळत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने अधिकच वाढल्याने गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे प्रभावित होणाऱ्या इतर क्षेत्रांप्रमाणेच शेतीक्षेत्रही आहे. घरात पडून असलेल्या शेतमालाची विक्री अनेक शेतकऱ्यांना करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी आर्थिक गरजांच्या पूर्ततेकरिता हमीभाव केंद्राऐवजी व्यापाऱ्यांनाच आपला शेतमाल कमी दरात दिला. त्यानंतरही परिस्थितीत बदल न झाल्याच्या नैराश्‍यातून अखेरीस जिल्ह्यात तब्बल २२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात या शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना एक लाख रुपयांच्या मदतीचे धोरण शासनाचे आहे. त्याकरिता विहीत नियमावलीदेखील तयार करण्यात आली आहे. परंतु सद्यःस्थितीत प्रशासकीय यंत्रणा कोरोना संदर्भातील कामात गुंग असल्यामुळे मदतीसाठी पात्र, अपात्र शेतकरीविषयक बैठकच घेण्यात आली नाही. परिणामी, या कुटुंबीयांना मदतीपासूनही वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनची तीव्रता एप्रिल महिन्यात वाढली होती. त्या काळात जिल्ह्यात सर्वाधिक आठ आत्महत्यांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com