पुणे : पीक नुकसानभरपाईपासून २२ हजार शेतकरी वंचित

22,000 farmers deprived of crop compensation
22,000 farmers deprived of crop compensation

पुणे ः पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. अजूनही ११३ गावांतील २२ हजार ३३९ शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना सुमारे चार कोटी ६२ लाख ५ हजार ३७४ रुपये मिळणे बाकी आहे. शासनाने हा निधी त्वरित उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

खेड तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील तीन कोटी ५१ लाख आठ हजार ३८६ रुपयांचे ५५ गावांतील हजार २२७ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे धनादेश देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर निधी जमा होणार आहे. प्राप्त झालेल्या निधीचे गावनिहाय धनादेश संबंधित तलाठ्याकडे वितरित करण्यास सुरुवात झाली असून, संबंधित बँकांकडे धनादेश तलाठी वितरित करणार आहेत. तालुक्याबाहेरील बॅंक असेल, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्यानावे वैयक्तिक काढण्यात आलेला धनादेश या शेतकऱ्यांना गावात जाऊन दिला जाणार आहे. 

त्यामुळे तलाठ्यामार्फत बॅंकेकडे धनादेश जाण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे चौकशी करूनच मग बॅंकेत जाऊन नुकसानभरपाईची रक्कम जमा झाल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात झालेल्या त्रुटी जुलै-आॅगस्टमध्ये पीक पंचनामे झालेल्या सहा हजार ४९७ शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविण्यात आलेला आहे. या शेतकऱ्यांचा निधी प्राप्त होताच वितरण करण्यात येईल. बाधित शेतकऱ्यांनी प्रस्तावासोबत बॅंक पासबुक, आधार कार्ड, झेरॉक्स कागदपत्रे जोडली आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com