नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित

crop damage
crop damage

मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी राज्य सरकारने २२७ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यानुसार, कोल्हापूर जिल्ह्याला ११० कोटी, सांगलीला १०२ तर सातारा जिल्ह्याला ५ कोटी रुपये मिळणार आहेत. यावर्षी राज्यातील विविध भागात २६ जुलै आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा नागरिकांना मोठा फटका बसला होता. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाला मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर महसूल विभागाने शुक्रवारी मदतीचा शासन आदेश जारी केला. कोकण, पुणे आणि अमरावती या तीन विभागातील १२ जिल्ह्यांना मिळून एकूण २२७ कोटी ७३ लाख ८६ हजार ६०० रुपयांची मदत वितरित केली जाणार आहे. यात ठाणे जिल्ह्याला २६ लाख ६९ हजार, पालघरला १ कोटी २८ लाख ९९ हजार, रायगडला १ कोटी २ लाख ९३ हजार, रत्नागिरीला ५० लाख ७७ हजार, सिंधुदुर्गला ६० लाख ७८ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे जिल्ह्याला १ कोटी १२ लाख ८७ हजार ५०० रुपये, सोलापूरला ३१ लाख ६२ हजार, अमरावती जिल्ह्याला ३ कोटी ६५ लाख ६७ हजार तर वाशीम जिल्ह्याला १ लाख ७४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com