जळगाव ः खानदेशात कापसाची शासकीय खरेदी कमी दरात सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी लाभ मिळत आहे. सुमारे २३ लाख क्विंटल खरेदी खानदेशातील विविध केंद्रांमध्ये झाल्याचा अंदाज आहे.
कापूस महामंडळाने (सीसीआय) जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, भुसावळ, बोदवड, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा येथे, धुळ्यात शिंदखेडा व शिरपुरात आणि नंदुरबारात शहादा व नंदुरबार येथे खरेदी सुरू केली आहे.
पणन महासंघाची खरेदी जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पारोळा येथे सुरू आहे तर अमळनेर येथे अलीकडेच खरेदी सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल येथे खरेदी केंद्र नाही. तसेच नंदुरबारमधील तळोदा येथेही कापूस खरेदी केंद्र नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना आपल्या भागातील नजीकच्या केंद्रात कापसाची विक्रीसाठी यावे लागत आहे.
‘रोज २५०० क्विंटलच खरेदी करा’
खरेदीला कमी प्रतिसाद मिळत असल्याने वाढती आवक लक्षात घेऊन सुरू केलेले अतिरिक्त खरेदी केंद्र पुढे बंद केले जातील, असेही संकेत आहेत. तसेच रोज फक्त अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी करा, असा आदेशही ‘सीसीआय’ने काढला आहे. यामुळेदेखील खरेदीला पुढे कमी प्रतिसाद मिळेल, असे चित्र आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.