पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४ हजार कोटी जमा

कर्जमाफी
कर्जमाफी

मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी शासन राबवित असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेमध्ये आतापर्यंत ५० लाख २७ हजार कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले. त्यासाठी २४ हजार १०२ कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत थेट जमा करण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. मंत्री देशमुख म्हणाले, की ही देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी असून यापूर्वी पंजाब राज्याने १० हजार कोटी रुपयांची, आंध्र प्रदेश १५ हजार कोटी रुपयांची, कर्नाटक ८ हजार कोटी, तेलंगणा १० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. राज्याच्या या योजनेत प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरीत्या दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात येते. एकाच कुटुंबातील व्यक्तीचे प्रत्येकी दीड लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आले. नवीन कर्ज घेण्यासाठी कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. त्यामुळे नवीन पीककर्ज घेण्यासाठी कर्जदार शेतकरी पात्र झाला.  ‘‘यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. अद्याप कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला आहे,’’ असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com