सांगलीत कृषी विभागात तब्बल २७० पदे रिक्त

agriculture department
agriculture department

सांगली ः शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून होते. मात्र, जिल्ह्यातील कृषी विभागात मंजूर ७८६ पदांपैकी सुमारे २७० पदे रिक्‍त आहेत. परिणामी शासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या नवनवीन योजनांच्या माहितीसह शेतात विविध पिकांचे प्रात्यक्षिक करून देण्याचे काम कृषी विभागाकडून केले जाते. शेतकऱ्यांचा थेट संबंध कृषी विभागाशी येतो. राज्य, केंद्र सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याबरोबरच शेतीचे सर्वेक्षण, शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते.  सांगली जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात कृषी सहायकाची ३६२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे गावपातळीवर शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देणे कठीण बनले आहे. तालुका कृषी अधिकारी १० पदे मंजूर असून, २ पदे रिक्त आहेत. कृषी विभागातील रिक्‍त पदे भरण्याची मागणी होत असून, शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम मात्र विकासावर होत आहे. कामकाजावर परिणाम... शेतकऱ्यांच्या संख्येनुसार सांगली जिल्ह्याला अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. एकूण ७८६ पैकी २७० पदे रिक्‍त असल्याने त्याचा परिणाम कामावर होत असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. एका बाजूने शेतीच्या प्रगतीसाठी शासन निधी पुरवत असताना दुसऱ्या बाजूला मात्र कर्मचारी भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com