धरणसाठा
धरणसाठा

देशातील धरणसाठा २९ टक्क्यांवर

नवी दिल्ली:  वाढत्या उन्हामुळे देशातील धरणसाठ्यांत कमालीची घट झाली आहे. देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये सध्या ४६.५१३ अब्ज घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण क्षमतेच्या केवळ २९ टक्के पाणी सध्या उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.५ टक्के तर दहा वर्षाच्या सरासरीच्या केवळ ३.० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती राष्ट्रीय पाणी आयोगाने दिली.   देशातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती आणि वाढत्या उन्हामुळे पाणीपातळीत झापाट्याने घट होत आहे. दुष्काळी भागातील धरणे यंदा भरलीच नाहीत, त्यामुळे आधीच पाणीसाठा कमी होता. उत्तर, दक्षिण आणि मध्य भारतात पाणीसाठ्याची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे, तर पूर्व आणि पश्‍चिम भारतात पाणीपातळीत घट झाली आहे. उत्तर भारतात सर्वाधिक साठा उत्तर भारतात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. उत्तरेतील हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये जलाशयांमधील पाणीसाठा एकूण साठवण क्षेमतेच्या ४९ टक्के आहे. जलाशय क्षेत्रांमध्ये चांगला पाऊस आणि नंतर अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागात अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात या राज्यांतील जलाशयांमध्ये केवळ २० टक्के साठा शिल्लक होता. म्हणेजच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २९ टक्के जास्त पाणीसाठा शिल्लक आहे.  पूर्व भागात ४० टक्के पाणीसाठा पूर्व भारतात सध्या एकूण साठवण क्षमतेच्या तुलनेत ५० टक्केही पाणीसाठा शिल्लक नाही. पूर्व भारतातील झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये सध्या केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या चारही राज्यांतील जलायशयांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा त्यात दोन टक्के घट झाली आहे. दक्षिण भारतात २० टक्के साठा दक्षिण भारतातही यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये सध्या २० टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याचा काळात १७ टक्के पाणीसाठा होता. दक्षिणेतील राज्यांमधील अनेक भागांत यंदा कमी पाऊस पडला तर काही ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे. पश्‍चिम भारतात सर्वांत कमी पाणी पश्‍चि भारतातील राज्यांमध्ये यंदा दुष्काळी स्थिती आहे. महाराष्ट्रात यंदा दुष्काळाची दाहकता खूपच वाढली आहे. गुजरात राज्यातही अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. त्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये २१ टक्के पाणीसाठा शिल्ल्क आहे. गेल्या वर्षी याच काळात जलाशयांमध्ये २८ टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यात ७ टक्के घट झाली आहे.  मध्य भारतात ३२ टक्के पाणीसाठा मध्य भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अवघा तीन टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात या चारही राज्यांतील महत्त्वाच्या जलाशयांमध्ये २९ टक्के पाणीसाठा होता. यंदा ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com