यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जवाटप केले जावे, यासाठी बैठका घेतल्या. कर्जवाटप मेळावे झाले. लोकप्रतिनिधींनी सूचना केल्या. परंतु, त्याचा राष्ट्रीयीकृत बॅंकांवर परिणाम झाला नाही. बॅंका सहकार्य करीत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी खातेच बंद केले. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंका वठणीवर आल्या असून दोन दिवसांत सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ३० कोटींचे कर्ज वाटप केले आहे. दरम्यान, शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशीदेखील कर्जवाटपासाठी ‘एसबीआय’ने ३५ शाखा सुरू ठेवल्या. शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. कर्जवाटपाची संथगती पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 'एसबीआय'मधील सहा खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईनंतर राष्ट्रीयीकृत बॅंकांना जाग आली. त्यांनी दोन दिवसांत तब्बल ३० कोटींचे पीककर्ज वाटप केले. पीककर्ज वाटपासाठी शनिवार व रविवार या सार्वजनिक सुटीच्या दिवशी बॅंका सुरू ठेवण्याचा निर्णय स्टेट बॅंकेने घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांत एसबीआयने केवळ ५१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर दोन दिवसांत तब्बल १० कोटी रुपये वाटप केले आहे.
एसबीआय शाखा | ४२ |
पीककर्ज वाटप | ३५ शाखांमधून |
ऑन ड्यूटी कर्मचारी | ८० |
एकूण कर्जवाटप | ६१ कोटी |
दोन दिवसांतील वितरण | १० कोटी |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.