नांदेड जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे ३० हजार दावे दाखल

नांदेड : जिल्ह्यात ११ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वैयक्तिक दावे दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यामुळे जिल्ह्यातून आॅफलाइन तसेच ऑनलाइन ३० हजारांपेक्षा अधिक दावे दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
30,000 crop damage claims filed in Nanded district
30,000 crop damage claims filed in Nanded district

नांदेड : जिल्ह्यात ११ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वैयक्तिक दावे दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले  होते. यामुळे जिल्ह्यातून आॅफलाइन तसेच ऑनलाइन ३० हजारांपेक्षा अधिक दावे दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

जिल्ह्यात रविवारी (ता.११ ) जोरदार झाला. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना सुरवात झाली होती. परंतु पाऊस मोठा  झाल्यामुळे खरीप पिकांचेही नुकसान झाले. जिल्ह्यातील सात तालुक्यांसह ३१ मंडळांत अतिवृष्टी नोंदली गेली. सरासरी ५६ मिलिमीटर झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. यात नदीकाठची पिके खरडून गेली. तर काही ठिकाणी पाणी साचून पिकाचे नुकसान झाले. 

अतिवृष्टीत जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ७७ शेतकऱ्यांचे तीन हजार ३३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. यानंतर बुधवारी झालेल्या पावसामुळे पुन्हा नऊ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. यात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनी ७२ तासाच्या आत विमा कंपनीला कळविण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यामुळे जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या ३० हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज, मेलद्वारे नुकसान झाल्याचे कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com