राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा वाळल्या

डाळिंब उत्पादक शेतकरी दुष्काळामुळे आर्थिक संकटात आला आहे. डाळिंब उत्पादकांनी फार मोठ्या प्रमाणात देशाला परकीय चलन मिळवून दिले आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाने संकटात मदत केली पाहिजे. - अंकुश पडवळे, अध्यक्ष, महा ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्यु फ्री फार्मस असोसिएशन
डाळींब बागा
डाळींब बागा

सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातीतल ३५ हजार हेक्टरहून अधिक डाळिंबाच्या बागांचे वाळून सरपण झाले. परंतु, या वाळलेल्या बागांची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही आणि या बागांचे अद्यापही पंचनामे झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पंचनामे कधी होणार आणि नुकसानभरपाई कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.  राज्यात सुमारे १ लाख ७५ हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड आहे. गेल्यावर्षी भयंकर दुष्काळात वाढती उष्णता आणि पाणीटंचाईमुळे राज्यातील ३५ हजार हेक्टरहून अधिक डाळिंबाच्या बागांचे सरपण झाले. परंतु, गेल्या वर्षभरापासून बाधित झालेल्या डाळिंबाचे पंचनामे झाले नाहीत.  कृषी विभागाच्या हालगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे मुश्कील झाले आहे. त्यात यंदाही दुष्काळाचे सावट आहे. अशा दुहेरी संकटात डाळिंब उत्पादक शेतकरी सापडला आहे. यंदाही डाळिंबाचा बहार धरता आला नाही. आजमितीस बागांना टॅंकरने पाणी देणे सुरू आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. परिणामी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.  शेतकऱ्यांच्या मागण्या

  • सुकलेल्या व वाळलेल्या बागांचे तातडीने पंचनामे करावेत. ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बागांना पाण्यासाठी व मल्चिंग करण्यासाठी एन. एच. एम.मधून तत्काळ अनुदान द्यावे.  
  • बागा वाळलेल्या शेतकऱ्यांना पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेतून नवीन लागवड योजनेत समाविष्ट करावे.
  • पाऊस नसल्याने बागा बाधित झाल्या आहेत. परंतु, या बागांचे पंचनामे होणे गरजेचे आहे. पंचनामे करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि तलाठी यांनी केले पाहिजेत.  - किरण जाधव, शास्त्रज्ञ (उद्यान विद्या), कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ
  • प्रतिक्रिया

    पाण्याअभावी २५ टक्के बागा वाळून गेल्या आहेत. त्याचे पंचनामे अद्यापही केले नाहीत. सध्या मृग बहार धरला आहे. पहिल्या पावसावर कळी आली आहे. पण आत्ता बागेला द्यायला पाणी नाही. त्यामुळे मोठे संकट आले आहे. - शकील काझी, डाळिंब उत्पादक, भाळवणी, जि. सोलापूर पाऊस नसल्याने बागा बाधित झाल्या आहेत. परंतु, या बागांचे पंचनामे होणे गरजेचे आहे. पंचनामे करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि तलाठी यांनी केले पाहिजेत.  - किरण जाधव, शास्त्रज्ञ (उद्यान विद्या), कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com