नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात ३९६ कोटींची मदत

396 crore Aid fund in the second phase in the Nashik district
396 crore Aid fund in the second phase in the Nashik district

नाशिक : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यातील मदत वर्ग केली आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमधील शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १ हजार २२५ कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी ३९६ कोटींचा निधी प्राप्त झाला. जिल्हा प्रशासनाने ५९८ कोटी रुपये मदतीची मागणी केली होती. मात्र, या मागणीपोटी आतापर्यंत ५७८ कोटी रुपये प्राप्त झाले आहे. बाकी असलेल्या २० कोटी रुपयांच्या मदतीसाठी प्रशासनाला वाट पाहावी लागणार आहे.

चालू वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीपर्यंत पावसाने जिल्हाभर मोठा तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह आलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली होती. काढणीस आलेली पिके मातीमोल झाल्याने जिल्ह्यात ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. 

यामध्ये द्राक्ष, डाळिंब बागांसह मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे ५९८ कोटी रुपयांचा निधी मागितला होता. या मागणीच्या पहिल्या टप्प्यात प्रशासनाला १८१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीचे वाटप पूर्णत्वाकडे आले असताना आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा ३९६ कोटी ६२ लाख ४५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारच्या महसूल विभागाने शुक्रवारी (ता. १३) घेतला. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना या निधीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com