पूर
पूर

बिहारमध्ये पुरामुळे मृतांची संख्या ४० वर

पाटणा, बिहार: बिहारमध्ये जोरदार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.  बिहार आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर आणि जोरदार पावसामुळे राज्यात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. तसेच भारतीय हवाई दलाकडून पूरग्रस्त भागात आवश्‍यक साहित्य टाकली जात आहेत. नागरिकांची सुटका करण्यासाठी बोटींचा वापरही केला जात आहे.    पाटणामधील राजेंद्रनगर भागात बचाव करणारे एनडीआरएफचे जवान विजय सिन्हा म्हणाले, की सोमवारपासून आम्ही या भागातून जवळपास सहा ते सात हजार नागरिकांचे स्थलांतर केले आहे. यामध्ये वृद्ध आणि आजारी लोकांचाही समावेश होता. आता आम्ही या नागरिकांना आवश्‍यक साहित्य पुरविण्यावर भर देत आहोत. एनडीआरएफच्या १९ तुकड्या १४ जिल्ह्यांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी पाच टीम पाटणा येथे काम करत आहेत. भागलपूर येथे २, बक्सर, मुंगेर, बेगुसराय, गोपालगंज, किशनगंज, कटीहार, खगारिया, मधुबनी, सुपौल, वैशाली, अरारिया आणि दरभंगा येथे प्रत्येकी एक तुकडी पाठविण्यात आली आहे.  मुख्यमंत्र्यांकडून पाहणी हारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी राजधानी पाटणा येथेही भेट देऊन पूरग्रस्त नागरिकांना आवश्‍यक सेवा देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेश दिले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पटना येथे जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे संकेत दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com