धान्य पट्ट्यात २०१८मध्ये ४३ शेतकरी आत्महत्या

धान्य पट्ट्यात २०१८मध्ये  ४३ शेतकरी आत्महत्या
धान्य पट्ट्यात २०१८मध्ये ४३ शेतकरी आत्महत्या

भंडारा : सिंचन, पर्यायी आणि व्यवसायिक पद्धतीविषयी जागृतीचा अभाव या कारणामुळे धानपट्ट्यात गेल्या काही वर्षांत शेतकरी आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ४३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.  भंडारा जिल्हा हा धान उत्पादक म्हणून ओळखला जातो. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी असलेल्या या जिल्ह्यात सिंचन सुविधांचादेखील अभाव आहे. परिणामी धानाची उत्पादकतादेखील मर्यादीत राहिली आहे. पर्यायी पीक आणि उत्पादकता वाढीच्या तंत्रज्ञान मार्गदर्शनात कृषी विभाग मागे पडला.  जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. त्यापुढेही शेतकरी कुटुंबासमोरील अडचणी संपल्या नाही. यातील २२ प्रकरणे मदतीसाठी पात्र तर २१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे चौकशीअंतर्गत एकही प्रकरण प्रलंबित नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उर्वरित कुटुंबांना मदत मिळणे आता दुरापास्त झाले आहे.  २०१८ या वर्षात ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या १६ वर्षांत ५४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. सर्वाधिक आत्महत्यांची नोंद २०१६ मध्ये झाली. यावर्षी ४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जानेवारी ते मार्च या कालावधीत एकही शेतकरी आत्महत्या नसल्याचे प्रशासन सांगते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com