बार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचितच

मळेगाव, जि. सोलापूर ः दीड वर्षांपूर्वी भीषण दुष्काळाला सामोरे गेलेल्या बार्शी तालुक्यातील ४३ हजार शेतकऱ्यांना २०१८-१९ मधील दुष्काळ निधी अद्यापही मिळालेला नाही.
43,000 farmers in Barshi Deprived of drought funds
43,000 farmers in Barshi Deprived of drought funds

मळेगाव, जि. सोलापूर  ः दीड वर्षांपूर्वी भीषण दुष्काळाला सामोरे गेलेल्या बार्शी तालुक्यातील ४३ हजार शेतकऱ्यांना २०१८-१९ मधील दुष्काळ निधी अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी आता विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे धाव घेत निवेदन दिले आहे.  

राव यांची पुण्यात नुकतीच भेट घेत या प्रश्नी राहुल भड, भास्कर काकडे, सतिश यादव, मोहन दराडे या शेतकऱ्यांनी हे निवेदन दिले.  कोरोनामुळे बंद झालेल्या बाजारपेठा, शेतमालाचे गडगडलेले भाव, हाताला काम नाही, कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न, यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

सन २०१८-१९ पडलेल्या भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाने दुष्काळ निधी मंजूर केला. त्याचे वितरणही झाले. बार्शी तहसिल कार्यालयामार्फत ४५ हजार ७८ खातेदारांना ३८ कोटी ५६ लाख ९७ हजार दुष्काळ अनुदान वाटप करण्यात आले. पण, त्याशिवायही तालुक्यातील आणखी ४३ हजार शेतकरी अद्यापही दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. 

शेतकऱ्यांनी वारंवार तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला. पण, कोणतीच दखल घेतली गेली नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com