अकोला जिल्ह्यात वादळी पावसामुळे ४४३५ हेक्टर पिकांचे नुकसान

4435 hectares of crop damage due to rain and storms
4435 hectares of crop damage due to rain and storms

अकोला ः जिल्ह्यात होळीदरम्यान झालेल्या पावसाने चार हजार ४३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, याचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अकोला, पातूर, बाळापूर तालुक्यात सोमवारी (ता. ९) वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. यात रब्बीतील पिकांसह भाजीपाला, फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. याबाबत कृषी व महसूल विभागाने सर्व्हे करून प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला.    

जिल्ह्यात खरीप हंगामात परतीच्या व अवकाळी पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस या पिकांचे संपूर्ण क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता रब्बीतही नैसर्गिक संकट आले. यावर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर आता मार्च महिन्यातही दोनवेळा अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांना फटका बसला. 

साेमवारी झालेल्या वादळी पावसाने गहू, हरभरा, कांदा, मका पिकांसह भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. लिंबू आणि पपई या फळवर्गीय पिकांनाही वादळाचा तडाखा बसला. अकोला तालुक्यातील कापशी, चिखलगाव परिसरात गारपिटीत हरभरा, गहू पिकांचे नुकसान झाले. गाेरेगाव खुर्द, गाेरेगाव बुद्रूक, लाखनवाडा, कंबळेश्वर, निंबी मालाेकार, बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा, वाघजळी, चिंचाेळी, पाटखेड, पुनाेती, मिर्झापूर, तिवसा, टिटवा, जाम वसू, दगडपारवा परिसरातील गहू, हरभरा, कांदा, फळपिकांचे नुकसान झाले.

भरपाईबाबत विमा कंपनीला पत्र जिल्ह्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. याचा सर्व्हे कृषी व महसूल विभागासोबत सुरू केला आहे. यावेळी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीही उपस्थित राहावे, असे पत्र जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी विमा कंपनीला दिले आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पीक विमा काढला आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे क्रमप्राप्त आहे, असे म्हटले आहे.

लोकप्रतिनिधींचाही पाठपुरावा  वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याबाबत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी सोमवारी  केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने सर्व्हे  करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com