पाच जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४५ लाख ९० हजार शेतकऱ्यांचा सहभाग

लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोलीत पीकविमा योजनेत ४५ लाख ९० हजार शेतकऱ्यांचा सहभाग
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोलीत पीकविमा योजनेत ४५ लाख ९० हजार शेतकऱ्यांचा सहभाग

लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांतील ४५ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विविध यंत्रणेच्या माध्यमातून विमा उतरविला. त्याद्वारे पाचही जिल्ह्यांतील २३ लाख ९ हजार हेक्‍टर क्षेत्र विमासंरक्षित झाले. शेतकरी हिश्‍श्‍यापोटी १८३ कोटी ८७ लाख रुपये शेतकऱ्यांनी भरले, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. 

लातूर कृषी विभागाअंतर्गत पाचही जिल्ह्यांत विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ३४ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरद्वारे; तर ११ लाख ५५ हजार शेतकऱ्यांनी बॅंकांद्वारे विमा उतरविला. ५ हजार ऑनलाइन थेट विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. २३ लाख ९ हजार हेक्‍टरवरील विमासंरक्षित रक्‍कम ७२३० कोटी ७५ लाख रुपये झाली. 

लातूर जिल्ह्यात १० लाख ८२ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ८८ हजार हेक्‍टर, उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ६२ हजार हेक्‍टर, नांदेडमधील ११ लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ७८ हजार हेक्‍टर, परभणी जिल्ह्यातील ८ लाख २० हजार शेतकऱ्यांनी ४ लाख २९ हजार हेक्‍टर; तर हिंगोलीतील ३ लाख ३९ हजार शेतकऱ्यांनी १ लाख ५० हजार हेक्‍टरवरील क्षेत्र विमासंरक्षित केले.

जिल्हानिहाय शेतकऱ्यांनी भरलेली हिस्सा रक्‍कम

लातूर ४६ कोटी १ लाख
उस्मानाबाद   ४१ कोटी ८० लाख
नांदेड  ४८ कोटी ९९ लाख 
परभणी  ३४ कोटी ३२ लाख 
हिंगोली १२ कोटी ७५ लाख 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com