मुंबई: महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आत्तापर्यंत (ता. ३ दुपारी १२ पर्यंत) १० लाख लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यानुसार ७ लाख ६ हजार ५०० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ४ हजार ८०७ कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. ३) दिली. विधिमंडळ पत्रकार कक्षात ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी ही योजना विना अडथळा आणि गतिमान पद्धतीने सुरू केल्याबद्दल सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला आणि माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास तसेच इतर अधिकारी व तंत्रज्ञांचे अभिनंदनही केले. कर्जमाफीसंदर्भात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘योजनेअंतर्गत ३५ लाख ८०९ कर्जखाती पोर्टलवर अपलोड झालेली आहेत. त्यापैकी पहिली यादी २४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. यात ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्जखात्यांचा समावेश होता. १५ जिल्ह्यातील २१ लाख ८१ हजार कर्जखात्यांची दुसरी यादी २८ फेब्रुवारी रोजी जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, नाशिक या ६ जिल्ह्यांतील ५ लाख कर्जखात्यांची यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापैकी १० लाख ३ हजार ५७३ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण शेतकऱ्यांकडून पूर्ण करून घेण्यात आले आहे. त्यानुसार आत्तापर्यंत ७ लाख ६ हजार ५०० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ४ हजार ८०७ कोटी रुपये जमा झाले आहेत.’’
कर्जमुक्ती योजनेची ठळक वैशिष्ट्ये :
२०१९ आणि २०१७ मधील कर्जमाफी योजनेतील फरक
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.